२६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.
शिवरायांनी तोरणा जिंखन्यासाठी ज्या योजना वापरल्या त्या अतुलनीय होत्या. वयाच्या फक्त अठराव्या वर्षीं त्यांनी हा गढ जिंखला. (आणि आजच्या या वयातील मुलांचा विचार केलातर या वयातील मुलं दहावी बारावी ची परीक्षाच देत असतात.)
शिवरायांनी गढावर चढाई करण्यापूर्वी अनेक मुख्य आणि महत्वाच्या बाबींचा विचार केला होता, असेच दिसून येते,पुढील मुद्यावरून ते लक्ष्यातच येईल.
गडाची ओळख
शिवरायांनी गुप्तचरांच्या माध्यमातून गडावरील संपूर्ण माहिती मिळवली होती. स्वतः रूप पालटून गडावरील माहिती मिळवली. गड प्रमुखाच्या गोटात शिवरायांचे गुप्तचर जाऊन पोहोचलो होते.
गडावरील पूर्ण तपशील मिळाल्या नंतरच शिवरायांनी पुढील योजना आखली.असे दिसून येते.
गाडावरील नाजूक भागांचा शोध
शिवरायांनी गडावरील सर्वप्रथम नाजूक भागांचा शोध घेतला. (नक्कीच एका योध्याने आपल्या शत्रूच्या नाजुक भागांचा शोध घेणं महत्वाच असत व तेच येथे शिवरायांनी केले).
सैनिकांचे नियोजन
शिवरायांनी चाणाक्ष लढाऊ व चपळ मोजक्या सैनिकांची निवड केली (यावरून कोणत्याही युद्धाचा परिणाम सैनिकांच्या संख्येवरून नाहीतर सैनिकाच्या वैचारिक सक्षमतेवरून दिसून येते )
रात्री अमावस्येचा दिवस
रात्री तोही अमावासेचा दिवस लोक अशुभ मानतात परंतु शिवरायांना तो मात्र मोख्याचा दिवस वाटला, कारण रात्री गडावरील अर्धे सैनिक झोपेच्या धुंदीत असतात, शिवाय अमावस्या असल्यामुळे नीट दिसतही नव्हते. (याला परस्तितीचे नीट आकलन म्हणतात )
शिवराययांचा हाच तो गनिमी कावा
शिवराय कमी सैनिकांच्या हाणित विजय मिळवण्याचे लक्ष ठेवत. कारण प्रत्येक सैनिक स्वराज्यासाढी मोलाचा होता. यालाच शिवरायांचा गनिमी कावा सुद्धा म्हणतात.
Nice
उत्तर द्याहटवा☺👍
हटवाShivajiraje engineering shikle hote Ka ? Ha 😊😊🥰
उत्तर द्याहटवाJai shivray
उत्तर द्याहटवा