मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

शिवरायांचा तोरणा विजय






शिवरायांचा तोरणा विजय 

शिवरायांनी तोरणा जिंखन्यासाठी ज्या योजना वापरल्या त्या अतुलनीय होत्या. वयाच्या फक्त अठराव्या वर्षीं त्यांनी हा गढ  जिंखला. (आणि आजच्या या वयातील मुलांचा विचार केलातर या वयातील मुलं दहावी बारावी ची परीक्षाच देत असतात.) 
शिवरायांनी गढावर चढाई करण्यापूर्वी अनेक मुख्य आणि महत्वाच्या बाबींचा विचार केला होता, असेच दिसून येते,पुढील मुद्यावरून ते लक्ष्यातच येईल.
गडाची ओळख 
शिवरायांनी गुप्तचरांच्या माध्यमातून गडावरील संपूर्ण माहिती मिळवली होती. स्वतः रूप पालटून गडावरील माहिती मिळवली. गड प्रमुखाच्या गोटात शिवरायांचे गुप्तचर जाऊन पोहोचलो होते.
गडावरील पूर्ण तपशील मिळाल्या नंतरच शिवरायांनी पुढील योजना आखली.असे दिसून येते. 
गाडावरील नाजूक भागांचा शोध 
शिवरायांनी गडावरील सर्वप्रथम नाजूक भागांचा शोध घेतला. (नक्कीच एका योध्याने आपल्या शत्रूच्या नाजुक भागांचा शोध घेणं महत्वाच असत व तेच येथे शिवरायांनी केले). 
सैनिकांचे नियोजन 
शिवरायांनी चाणाक्ष लढाऊ व चपळ मोजक्या सैनिकांची निवड केली (यावरून कोणत्याही युद्धाचा परिणाम सैनिकांच्या संख्येवरून नाहीतर सैनिकाच्या वैचारिक सक्षमतेवरून दिसून येते )
रात्री अमावस्येचा दिवस 
रात्री तोही अमावासेचा दिवस लोक अशुभ मानतात परंतु शिवरायांना तो मात्र मोख्याचा दिवस वाटला, कारण रात्री गडावरील अर्धे सैनिक  झोपेच्या धुंदीत असतात,  शिवाय अमावस्या असल्यामुळे नीट दिसतही नव्हते. (याला परस्तितीचे नीट आकलन म्हणतात )
शिवराययांचा हाच तो गनिमी कावा 
शिवराय कमी सैनिकांच्या हाणित विजय मिळवण्याचे लक्ष ठेवत. कारण प्रत्येक सैनिक स्वराज्यासाढी मोलाचा होता. यालाच शिवरायांचा गनिमी कावा सुद्धा म्हणतात. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...