मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

श्री कृष्णा च्या बालपणीचे वैशिष्ट्य व गुण

  श्री कृष्णा च्या बालपणीचे वैशिष्ट्य व गुण  श्री कृष्णांच्या बाळपणापासून अनेक गुण घेऊ शकतो जसे की - 1.श्रीकृष्णाचा जन्मच कारागृहात झाला. मामा वैरी तर आई वडील बंधिस्त म्हणजेच संकटाची सुरुवातच जन्मापासूनच झाली होती. पण नियतीला तेथे काही वेगळेच घडवायचे होते. त्यामुळेच श्री कृष्ण कारागृहातून मूक्त होऊन नंदराजाच्या घरी पोहचले  आपल्याही आयुष्यात पहिले तर आपलाही जन्म गरीब किंवा श्रीमंत परिवारात झाला आहे, याचा विचार न करता आपल लक्ष्य  काय आहे, विचार करण महत्वाचे आहे.  (शिवाजीमहाराजांचा जन्मही दुःखाच्या परिस्थितीत शिवनेरीवर झाला होता.) 2.श्री कृष्ण हे देव आहे. पण जर आपण त्यांच्याकडे एका मित्रा प्रमाणे पहिले तर अनेक गुण हेऊ शकतो. जसे की श्री कृष्णाने बालपणीच अनेक राक्षसांचा वध केला होता   आपल्याही आयुष्यात अनेक संकट येतात पण आपल्या क्षमते नुसार त्यांचा सामना केला तर आपले ही आयुष्य ठरलेल्या लक्ष्या पर्यंत जाऊन पोहचेल.  3.श्री कृष्णा लहानपणापासूनच नटखट खोडकर आनंदी व उत्साहित होते पण तेवढेच माता यशोदेचे आज्ञाकारी ही होते.  आपणही बालपणात खोडकर असतो पण तेवढेच आ...

शिवरायांचा तोरणा विजय

शिवरायांचा तोरणा विजय  शिवरायांनी तोरणा जिंखन्यासाठी ज्या योजना वापरल्या त्या अतुलनीय होत्या. वयाच्या फक्त अठराव्या वर्षीं त्यांनी हा गढ  जिंखला. (आणि आजच्या या वयातील मुलांचा विचार केलातर या वयातील मुलं दहावी बारावी ची परीक्षाच देत असतात.)  शिवरायांनी गढावर चढाई करण्यापूर्वी अनेक मुख्य आणि महत्वाच्या बाबींचा विचार केला होता, असेच दिसून येते,पुढील मुद्यावरून ते लक्ष्यातच येईल. गडाची ओळख  शिवरायांनी गुप्तचरांच्या माध्यमातून गडावरील संपूर्ण माहिती मिळवली होती. स्वतः रूप पालटून गडावरील माहिती मिळवली. गड प्रमुखाच्या गोटात शिवरायांचे गुप्तचर जाऊन पोहोचलो होते. गडावरील पूर्ण तपशील मिळाल्या नंतरच शिवरायांनी पुढील योजना आखली.असे दिसून येते.  गाडावरील नाजूक भागांचा शोध  शिवरायांनी गडावरील सर्वप्रथम नाजूक भागांचा शोध घेतला. (नक्कीच एका योध्याने आपल्या शत्रूच्या नाजुक भागांचा शोध घेणं महत्वाच असत व तेच येथे शिवरायांनी केले).  सैनिकांचे नियोजन   शिवरायांनी चाणाक्ष लढाऊ व चपळ मोजक्या सैनिकांची निवड केली (यावरून कोणत्याही युद्धाचा परिणाम सैनिकांच्या संख्येवरून ...

शिवरायांच्या बालपणीचे गुण

शिवरायांचे बालपण  शिवरायांच्या बालपनाचा विचार करण्यापूर्वी जिजाऊचां विचार करणं महत्वाचं आहे  जिजाऊंनी लहानपनीच शिवरायांना  रामायण महाभारतल्या कथा सांगीतल्या ( पण आजचा विचार केला तर पालकांना मुलांशी बोलण्यासाठी सुद्धा वेळ नाहीये) शिवरायांचे लहानपणापासूनच युध्द कलेचे प्रशिक्षण सुरु झाले होते  . (पण आजचा विचार केलातर मुलांचा जास्त वेळ मोबाईल टीव्ही वरच जातोय) शिवराय लहानपणापासूनच उत्साही होते नवीन गोष्टी शिकण्यासाठी दूरवर फिरत गड किल्ले पाहत मित्र बनवट नवीन डावपेच शिकत. ( पण आजचा विचार केलातर युवकांमध्ये उत्साह नाही घरात मोबाइला चटकून राहतात) शिवराय बालपनापासून स्वराज्याचा विचार करत होते.   ( पण आजचे तरुण नोकरीचाच विचार करतोय ) शिवाजी महाराजांनी लहानपणापासूनच शरीराबरोबर मन व बुद्धीलाही बळकट केलं  (पण आजचा तरुण शरीर तर बळकट बनवतोय पण मन विवेकी बनवट नाहीये). शिवराय सात भाषेत प्रवीण होते अनेक युद्धकला गणित ग्रंथात प्रवीण होते.   ( पण आजचा तरुण दहावी पास करण्याआधी सुद्धा कॉप्या करतोय) वरील मत खर असेल तर खाली कंमेन्ट करा.